आपला मोबाईल संगणकाशी जोडून एसएमएस पाठवा
आजकाल जवळपास सर्वजण टच स्क्रिन मोबाईल फोन वापरु लागले आहेत. टच स्क्रिन मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पण टच स्क्रिन मोबाईलवर टाईप करणं हे मात्र फारसं सोयीचं आहे असं म्हणता येणार नाही. अशा प्रकारच्या मोबाईलवर टाईप करत असताना आपलं बोट थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी आपण टाईप करत असलेला शब्द चुकतो. एखदा दुसरा एसएमएस अशाप्रकारे टाईप करुन पाठवायचा असेल तर ठिक आहे, पण काही लोक आपल्या मोबाईलवर एसएमएस पॅक मारुन एसएमएस चॅट करत असतात. अशा लोकांसाठी मात्र टच स्क्रिन मोबाईलवर लवकर आणि अचूक टाईप करणं ही काहीशी समस्या ठरु शकते.



